Gandhari[1]
-
Name Gandhari Gender Female Ancient Hindu Kingdom Gandhara, Ancient Kingdoms, India Princess Person ID I111 Hindu Puran Genealogy Tree | Kauravas branch, Somavanshi Last Modified 27 May 2017
Father Subala Family ID F58 Group Sheet | Family Chart
Family Dhritarashtra Children 1. Duryodhana, d. Kurukshetra, Ancient Cities, India 2. Dushasana, d. Kurukshetra, Ancient Cities, India 3. Dussaha, d. Kurukshetra, Ancient Cities, India + 4. Dushala 5. Jalsandha, d. Kurukshetra, Ancient Cities, India 6. Sama, d. Kurukshetra, Ancient Cities, India 7. Saha, d. Kurukshetra, Ancient Cities, India 8. Vindha, d. Kurukshetra, Ancient Cities, India 9. Anuvindha, d. Kurukshetra, Ancient Cities, India 10. Durmukha, d. Kurukshetra, Ancient Cities, India 11. Chitrasena, d. Kurukshetra, Ancient Cities, India 12. Durdarsha, d. Kurukshetra, Ancient Cities, India 13. Durmarsha, d. Kurukshetra, Ancient Cities, India 14. Dussaha, d. Kurukshetra, Ancient Cities, India 15. Durmada, d. Kurukshetra, Ancient Cities, India 16. Vikarna, d. Kurukshetra, Ancient Cities, India 17. Dushkarna, d. Kurukshetra, Ancient Cities, India 18. Durdhara, d. Kurukshetra, Ancient Cities, India 19. Vivinsati, d. Kurukshetra, Ancient Cities, India 20. Durmarshana, d. Kurukshetra, Ancient Cities, India 21. Durvishaha, d. Kurukshetra, Ancient Cities, India 22. Durvimochana, d. Kurukshetra, Ancient Cities, India 23. Dushpradharsha, d. Kurukshetra, Ancient Cities, India 24. Durjaya, d. Kurukshetra, Ancient Cities, India 25. Jaitra, d. Kurukshetra, Ancient Cities, India 26. Bhurivala, d. Kurukshetra, Ancient Cities, India 27. Ravi, d. Kurukshetra, Ancient Cities, India 28. Jayatsena, d. Kurukshetra, Ancient Cities, India 29. Sujata, d. Kurukshetra, Ancient Cities, India 30. Srutavan, d. Kurukshetra, Ancient Cities, India 31. Srutanta, d. Kurukshetra, Ancient Cities, India Last Modified 27 May 2017 Family ID F55 Group Sheet | Family Chart
-
Event Map = Link to Google Earth Pin Legend : Address : Location : City/Town : County/Shire : State/Province : Country : Not Set
-
Notes - गान्धारी--- हस्तिनापुरच्या धृतराष्ट्र राजाची पत्नी आणि दुर्योधनादि शंभर कौरवांची माता. ही गंधार देशाधिपती सुबल राजाची कन्या होती (म.आ.९०.६१). महाभारतमते ही दक्षकन्या मति हिच्या अंशाने जन्मली होती (म.आ.६१९८). एक न्यायनिष्ठुर स्त्री या नात्याने व्यासांनी महाभारतात हिचे स्वभावचित्रण केले असून, दुर्योधनादि पुत्रांच्या हेकेखोर वर्तनामुळे हिच्या मनाची झालेली तडफड येथे अत्यंत प्रभावीपणे चित्रित केली आहे.
वरप्राप्ती---बाल्यकाळातच हिने रुद्राची आराधना करुन शंभर पुत्र होण्याचे वरदान प्राप्त केले होते. हिच्या वरप्राप्तीची ही हकीगत् ऐकूनच भीष्मदिकांनी हस्तिनापुरचा राजा धृतराष्ट्र याच्यासाठी हिला मागणी घातली. कुरुवंशातील संततिहीनता हिच्या आगमनाने नाहीशी होईल असा या मागणीमागे मुख्य हेतू होता (म.आ.१०३. ९-१०).
महाभारतात अन्यत्र हिला द्वैपायन व्यासाच्या आशीर्वादानें शंभर पुत्र प्राप्त झाल्याचा निर्देश आढळतो. (म.आ.१०७.७-८)
पातिव्रत्य---ही महान पतिव्रता होती. आपला भावी पती जन्मांध असल्याचे समजताच हिने सहानुभाव दर्शविण्यासाठी रेशमी वस्त्राची पट्टी आपल्या डोळ्यांवर बांधली आणि आजन्म ती तशीच कायम ठेवली. पतीची हरके इच्छा पुरी करण्याचे, तसेच परपुरुषाचे दर्शन न घेण्याचे व्रतहि हिने आजन्म पाळले (म.आ.१०३.१३).
पुत्रप्राप्ति---वरप्राप्तीनुसार हिला विवाहानंतर लौकरच गर्भधारणा झाली. कुंतीला युधिष्ठिर नामक पुत्र झाल्याची वार्ता समजताच असूयेने हिने आपला अपुर्या दिवसांचा गर्भ बाहेर काढला . त्यामुळे लोळागोळा झालेला मृतप्राय गर्भपिंड पुत्र म्हणून हिला प्राप्त झाला, आणि ही शोकातिरेकाने रडू लागली. हिची ही अवस्था पाहून व्यासास दया आली आणि त्यांनी त्या गर्भाचे शंभर तुकडे करुन ते एका घृतकुंभामध्ये स्थापन करण्यास सांगितले. यथावकाश हिचा मृतगर्भ पुन्हा जीवित होऊन, घृतकुंभाद्वारे हिला दुर्योधनादि शंभर पुत्र झाले (म.आ.१०७१०-१४). कन्याप्राप्तीची हिची इच्छाहि व्यासांनी हिला दुःशला नामक कन्या प्रदान करुन पुरी केली (म.आ.१०७.३७).
हितोपदेश---दुर्योधनाने पांडवांशी अकारन वैर सुरु केल्यानंतर हिने त्यास नानापरीने समजाविण्याचा प्रयत्न केला. दुर्योधनाच्या दुष्ट आणि मत्सरी स्वबहवाबद्दल, तसेच द्रौपदी-वस्त्रहरणप्रसंगीच्या त्याच्या ओंगळ वर्तनाबद्दल हिने त्याची स्पष्ट शब्दात कान उघाडणी केली (म.उ.१२७). परंतु धृतराष्ट्राच्या द्विधा आणि कमकुवत मनोवृत्तीमुळे हिचा नाइलाज झाला . पांडवांना वनातून बोलावून आणून त्यांना अर्धे राज्य देण्याचा हिचा प्रयत्नहि या कारणानेच निष्फळ ठरला (म.उ.१२७-१२८). म्हणूनच संभाव्य युद्धाला धृतराष्ट्र हाच जबाबदार असल्याची स्पष्टोक्ती हिंने त्याला ऐकविली होती (म.उ.१२७.१०-१५).
भारतीय युद्धानंतर---या युद्धामध्ये झालेल्या आपल्या पुत्रांच्या संहाराने ही दुःखाने वेडीपिशी बनली. दुर्योधनाच्या निर्घृण वधाबद्दल, तसेच दुःशासनाच्या मांडीतील रक्त पिण्याच्या अघोरी कृताबद्दल हिन भीमास नानापरीने दूषणे दिली. ‘दुःशासनाचे रक्त आपले दात आणि ओठ यांच्या आत गेले नाही,’ या भीमाच्या पोरकट उत्तरोनि हिचा संताप अधिकच वाढला (म.स्त्री.१४.१४). हिच्या नजरेला नजर देण्याचे युधिष्ठिर टाळू लागला. तेव्हा हिने एक जळजळीत दृष्टीक्षेप त्याच्या पायाच्या नखांवर टाकला. त्यायोगें ती काळीठिक्कर पडली (म.स्त्री.१५.७). आपल्या मृत पुत्रांच्यासाठी शोक करणार्या द्रौपदी आणि कुंतीचे हिन सांत्वन केले (म.स्त्री.१५.१७).
हिचे परोपरीने सांत्वन करु पाहणार्या कृष्णाला हिने धुकावून लावले. रणभूमीतील स्वपुत्रांची छिन्नविच्छिन्न झालेली प्रेते त्या स दाखवून या सर्व अनर्थास कृष्ण हाच जबाबदार असल्याचे त्यास परखडपणे सुनावले, आणि छत्तीस वर्षाच्या आत त्याचा संपूर्ण कुलक्षय होण्याचा शाप हिने त्याला दिला. हिच्या क्रोधाच्या या आवेगामुळे कृष्ण गांगरुन गेला. आपला कुलक्षय होणार असल्याचे आपणांस अगोदरपासूनच ठाऊक आहे, असे म्हणून त्याने वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला (म.स्त्री.२६.४१-४३). परंतु यादवांच्या महाभयानक संहारसत्राच्या वेळी तसेच स्वतःच्या निर्याणप्रसंगी पतिव्रता गांधारीची शापवाणी त्यास पुन्हा आठवली (म.मौ.५.२१; कृष्ण १ पहा).
मृत्यु--- युद्धसमाप्तीनंतर ही आणि धृतराष्ट्र पांडवांसमवेत हस्तिनापुरी राहू लागले. सुस्वभावी युधिष्ठिर हिची सर्वतोपरी काळजी घेत असे. परंतु भीम मात्र हिला एकसारखे उणेदुणे बोलून हिच्या पूर्वदुःखाच्या स्मृती ताज्या करीत असे.
भीमाच्या या अशिष्ट वर्तनाने हिला वैराग्य उत्पन्न झाले आणि ही धृतराष्ट्र, कुंती आणि विदुर यांच्यासमवेत वनात गेली. तेथे व्यासाने हिला कुंतीला आणि धृतराष्ट्राला मृत पुत्रांचे दर्शन घडविले (म.आश्र.४०). तदनंतर गंगाद्वारानजीकच्या वनामध्ये लागलेल्या दावनलात ही धृतराष्ट्र आणि कुंतीसमवेत जळून भस्म झाली (म.आश्र.४५; भा. १.१३.२७; ९.२२-२६)
- गान्धारी--- हस्तिनापुरच्या धृतराष्ट्र राजाची पत्नी आणि दुर्योधनादि शंभर कौरवांची माता. ही गंधार देशाधिपती सुबल राजाची कन्या होती (म.आ.९०.६१). महाभारतमते ही दक्षकन्या मति हिच्या अंशाने जन्मली होती (म.आ.६१९८). एक न्यायनिष्ठुर स्त्री या नात्याने व्यासांनी महाभारतात हिचे स्वभावचित्रण केले असून, दुर्योधनादि पुत्रांच्या हेकेखोर वर्तनामुळे हिच्या मनाची झालेली तडफड येथे अत्यंत प्रभावीपणे चित्रित केली आहे.
-
Sources
- [S137]
WIKI.Gandhari_(Character), Wiki, (Wikipedia), http://en.wikipedia.org/wiki/Gandhari_(character).
No wiki page can be retrieved.This information is sourced from Wikipedia, the leading online open-content collaborative (crowd-sourced) encyclopedia. Wikipedia and/or TransLiteral Foundations can not guarantee the validaity of content above and can not be held responsible for inaccuracies or libelious information within. Please see Wikipedia General Disclaimer.
- [S137]
Comments | अभिप्राय
Comments written here will be public after appropriate moderation.Like us on Facebook to send us a private message.